<em>राज्यसभेप्रमाणे विधानपरिषदेत भाजपचा चमत्कार..!</em>
वैभववाडी |नवलराज काळे :
राज्यसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकारला विधान परिषद निवडणुकीतही मोठा धक्का बसला आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत.
राज्यसभेनंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद निवडणुकीतही चमत्कार घडवला आहे. भाजपचे पाचही उमेदवार फडणवीस यांनी निवडून आणले आहेत.
विधान परिषदेच्या नवव्या आणि दहाव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप तसंच चंद्रकांत हंडोरे यांच्यात जोरदार चुरस होती. पण अखेर प्रसाद लाड यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची रणनिती पुन्हा एकदा यशस्वी ठरली आहे.
भाजपने पाच उमेदवार दिले होते, त्यापैकी चार उमेदवार विजयी होणार हे निश्चित होतं. त्यानुसार राम शिंदे, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे विजयी ठरले. तर पाचव्या जागेसाठी प्रसाद लाड यांची भाई जगताप यांच्याशी चुरस होती. पण प्रसाद लाड यांनीही बाजी मारल्याने देवेंद्र फडणवीस यांची जादू पुन्हा चालली.
भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाल्यानंतर भाजपच्या आमदारांनी एकच जल्लोष केला.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)