ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
जमिनीचा मोबदला दिला तरच धरणाचे काम सुरू करायला देण्याची करूळ ग्रामस्थांची आक्रमक भूमिका.

जमिनीचा मोबदला दिला तरच धरणाचे काम सुरू करायला देण्याची करूळ ग्रामस्थांची आक्रमक भूमिका.

प्रकाशन: 19 Mar 2022 03:09 PM
वाचन संख्या 60

आज काम बंद आंदोलन…!

वैभववाडी | नवलराज काळे : तालुक्यातील करुळ डोणा धनगरवाडी येथील धरणग्रस्तांना भूसंपादनाचा मोबदला न देता धरणाचे काम सुरु आहे.या विरोधात जमीनमालक व शेतकरी आक्रमक झाले आहेत. १९ मार्चपासून धरणाचे काम बंद पाडण्याचा इशारा डोणा धनगरवाडी ग्रामस्थ विकास मंडळ करुळ यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना निवेदनाद्वारे दिला आहे.


करुळ डोणा येथे लघुपाटबंधारे विभागाच्यावतीने धरण बांधले जात आहे.मात्र काम सुरू होऊन सात वर्षे होत आली तरी शेतकऱ्यांना जमीन मोबदला दिला नाही. यावरून शेतकरी व ग्रामस्थ आक्रमक झाले असून मोबदला मिळेपर्यंत धरणाचे काम बंद ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात लेखी निवेदन जिल्हाधिकारी व संबंधित विभागाला दिले आहे. या निवेदनात म्हटलं आहे, धरण बांधताना लघु पाटबंधारे विभागाने कायदेशीरपणे भूसंपादन न करता नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बदलून गावातील शेतकऱ्यांच्या शेती, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.तसेच भूसंपादन प्रस्ताव क्र.६/२०१३ चे संयुक्त मोजणीपञकात नदीचे पाञ बदलेला मार्ग हा संयुक्त मोजणी पञात नोंद करण्यात आलेला नाही.त्यामुळे सदरचे भूसंपादन हे बेकायदेशीर आहे.बेकायदेशीर नदीचा प्रवाह बदल्यामुळे वाडीतील घरांना धोका निर्माण झाला आहे.तसेच धरणबांधकामाचा भराव टाकला आहे.ती शेतजमीन होती.माञ सात आठ वर्षे होऊनही त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही.त्यामुळे सदर जमिनमालक शेतकऱ्यांवर गाव सोडून बाहेरच्या गावात मोलमजूरीसाठी जावे लागले आहे.
कायदेशीर भूसंपादन करुन बाधीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी व त्यानंतर कामाला सुरुवात करावी अशी मागणी करुनही सात आठ वर्षात भूसंपादन करुन मोबदला देण्यात आलेला नाही.तसेच दांडगाईने फेब्रुवारी महिन्यापासून काम सुरु करण्यात आले आहे.

धरणासाठी आवश्यक जमिनीचे रितसर भूसंपादन करुन नुकसान भरपाई देण्यात यावी.तसेच वस्ती पर्यंतचा रस्ता करुन पुल, मो-या, संरक्षक भिंतीचे काम पूर्ण करावे.बदलेल्या नदी प्रवाहाच्या दोन्हीही बाजूने संरक्षक भिंत बांधणे. बाधीत शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला दयावा. वरील मागण्यांची पूर्तता झाली नाही,तर १९ मार्चपासून काम बंद पाडण्याचा इशारा डोणा धनगरवाडी ग्रामस्थ विकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र गुरखे,सचिव आकाराम गुरखे, खजिनदार धोंडू गुरखे यांनी दिला आहे.

धरणाचे काम करीत असताना धरणाच्या भिंतीमध्ये मोठमोठे दगड टाकले आहेत.हे काम दर्जाहीन झाले आहे.त्यामुळे भविष्यात धरण फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे या कामाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी.अशी मागणी ग्रामस्थांनी आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स