चिंदर येथील(मुंबईस्थीत) सुभाष तावडे यांचे निधन
आचरा/ विवेक परब: चिंदर गावठवाडी येथील मुंबईस्थीत सुभाष विष्णू तावडे यांच काल निधन झाल. ते 66 वर्षांचे होते. मुंबई येथील त्याच्या कार्याचा गौरव करत अनेक संस्था, संघटनानी त्यांना “समाज सेवक”, “समाज सम्राट” अशा पदव्या बहाल केल्या होत्या. “विजय क्रिडा मंडळ भांडूप” सारख्या तळागाळा पर्यंत सामाजिक पणा जपणा-या संघटनानशी ते सक्रिय होते.
“भाऊ” या नावाने प्रसिद्ध असणारे तावडे दानशुर पणा बद्दल विख्खात होते. गावातील अनेक तरुणांना मुंबईत रोजगार प्राप्त करुन देण्यासाठी ते प्रयत्न करत असत.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक मुंबईस्थीत संघटना, मित्र परिवार, समाजातील अनेक घटकांन कडून दुखः व्यक्त करण्यात येत आहे.