दरड कोसळायचे धोके असलेल्या ठिकाणांचा पावसाळ्यापूर्वीच पहाणी करुन आढावा घेणे आवश्यक : सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर.
कणकवली | अविनाश गावडे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील माऊली मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी, २०२४ चा पावसाळा तथा मान्सून पाऊस सुरु होण्यापूर्वीच्या नियोजनाबद्दल त्यांचे विचार मांडताना, दरड दुर्घटना टाळण्यासाठी, संभाव्य दरड प्रवण ठिकाणांची पहाणी करुन संबंधित यंत्रणांनी त्याबाबतचा अधिकृत आढावा घ्यायची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे. अशाप्रकारची पहाणी आधीच केली गेलीअसेल तर ते प्रशंसनीय आहे असेही त्यांनी सांगितले आहे.
जिल्ह्यात येणारे घाट मार्ग, रेल्वे रुळांच्या आसपासचे संवेदनशील डोंगर टेकड्या, दुर्गम भागातील विविध वस्ती वाड्यांतील दरड कोसळायचे धोके असलेली ठिकाणे यांना पावसाळ्या पावसाळ्या आधीच हेरून, तिथे दरड कोसळायला प्रतिबंधात्मक नियोजन करणे किंवा अन्य मदतगार उपाय योजनांचा आता गांभिर्याने विचार व्हायलाच हवा अशा भीषण घटना मागिल काही पावसांत घडल्या आहेत त्यामुळे ‘सावध तो सुखी’ अशा तत्वावर यंत्रणांनी काम करणे आवश्यक असल्याचे मत त्यानी व्यक्त केले आहे. अनुचित दुर्घटना घडल्यानंतर एकमेकांकडे बोट दाखवणे आणि दुर्घटनाग्रस्तांची नंतर मलम पट्टी करण्यापेक्षा खबरदारी घेणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
वर्षा पर्यटनासाठी देखील जास्तीत जास्त पर्यटक जिल्ह्यात यावेत यासाठी रस्तेमार्ग सुरक्षित असणे व सुरळीत असणे महत्वाचे आहे असेही सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी सांगितले आहे.