27.2 C
Mālvan
Friday, April 11, 2025
IMG-20240531-WA0007

दिल्लीत प्रजासत्ताक दिनाला ‘वंदे भारतम्’ कार्यक्रमात सिंधुदुर्गातील ५ मुली सादर करणार मराठी संस्कृतीचा अविष्कार ; भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी विद्यार्थिनींना आर्थिक मदत करत दिल्या शुभेच्छा.

- Advertisement -
- Advertisement -

भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर , मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या हस्ते मदत सुपूर्त.

मालवण | सुयोग पंडित : येत्या २६ जानेवारीला दिल्ली त दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येत असलेला प्रजासत्ताक दिन सोहळ्या निमित्त महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी लावणी या नृत्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५  विद्यार्थिनींची निवड झाली आहे. कु. करीना खराडे (मालवण), कु. ऋतुजा राणे (मालवण ), कु.समिता कुबल (मालवण), कु. ममता गावडे (वेंगुर्ला ), कु.सानिका केरकर (कुडाळ) यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवड झाली आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक दर्शन घडवण्यासाठी वंदे भारतम् या कार्यक्रमात या विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत.

२६जानेवारी रोजी कर्तव्य पथ दिल्ली येथे हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुरमु व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.  या विद्यार्थिनींना दिल्ली येथे जाण्यासाठी माजी खासदार व भाजपा नेते निलेश राणे (मालवण कुडाळ विधानसभा संयोजक) यांनी आर्थिक मदत करून सहकार्य केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी विजय केनवडेकर (जिल्हा उपाध्यक्ष) , तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या हस्ते मदत देण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, भाजयुमो शहराध्यक्ष ललित चव्हाण, संतोष गावकर ,रवि घागरे ,पंकज गावडे, संकेत कुलकर्णी, संकेत हसोळकर उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर , मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या हस्ते मदत सुपूर्त.

मालवण | सुयोग पंडित : येत्या २६ जानेवारीला दिल्ली त दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येत असलेला प्रजासत्ताक दिन सोहळ्या निमित्त महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी लावणी या नृत्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५  विद्यार्थिनींची निवड झाली आहे. कु. करीना खराडे (मालवण), कु. ऋतुजा राणे (मालवण ), कु.समिता कुबल (मालवण), कु. ममता गावडे (वेंगुर्ला ), कु.सानिका केरकर (कुडाळ) यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवड झाली आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक दर्शन घडवण्यासाठी वंदे भारतम् या कार्यक्रमात या विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत.

२६जानेवारी रोजी कर्तव्य पथ दिल्ली येथे हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुरमु व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.  या विद्यार्थिनींना दिल्ली येथे जाण्यासाठी माजी खासदार व भाजपा नेते निलेश राणे (मालवण कुडाळ विधानसभा संयोजक) यांनी आर्थिक मदत करून सहकार्य केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी विजय केनवडेकर (जिल्हा उपाध्यक्ष) , तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या हस्ते मदत देण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, भाजयुमो शहराध्यक्ष ललित चव्हाण, संतोष गावकर ,रवि घागरे ,पंकज गावडे, संकेत कुलकर्णी, संकेत हसोळकर उपस्थित होते.

error: Content is protected !!