रेशनकार्ड धारकांना मिळणार शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज ; राज्य सरकारचा निर्णय.
७ कोटी लोकांना मिळणार थेट लाभ..!
मुंबई | ब्युरो न्यूज : आज झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमडळाच्या बैठकीत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रेशनकार्डधारक १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजे जवळपास ७ कोटी लोकांना रवा, चणाडाळ, साखर व तेल ( प्रत्येकी एक किलो पॅकेज) शंभर रुपयांत देणार असल्याचा निर्णय राज्य अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला आहे. राज्यातील जवळपास ७ कोटी लोकांना याचा थेट लाभ होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)