भाजप किसान मोर्चा मालवण तालुक्याच्यावतीने शेतीनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार.
किसान मोर्चा मालवण तालुक्याची पदाधिका-यांची नियुक्ती पत्रे प्रदान
आचरा /विवेक परब : साल http://localhost/news/public/uploads/2020-21मध्ये शासनस्तरावर घेण्यात आलेल्या भातपिक स्पर्धेत मालवण तालुकास्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या श्री भक्तप्रल्हाद चव्हाण वाघावणे-देवली यांना प्रथम,श्री विश्वास आचरेकर निरोम यांना व्दितिय, तर श्री राम परब ,कांदळगाव तृतिय यांना अनुक्रमे भाजप तालुकाध्यक्ष-धोंडी चिंदरकर, भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष-उमेश सावंत, नगर सेवक-दिपक पाटकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष-महेश सारंग यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
यावेळी मालवण तालुका किसान मोर्चा बाळ भोजने-कोळब व जयवंत परब-वायंगवडे यांना तालुका उपाध्यक्ष, मिलिंद लोहार-डिकवल व दिगंबर जाधव-चिंदर यांना सरचिटणीस, सुहास सावंत-पळसंब यांना चिटणीस तर प्रकाश राणे- खोटले यांना सल्लागार म्हणून नियुक्ती पत्रे देण्यात आली.
यावेळी बोलताना भाजप मालवण तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर म्हणाले कि किसान मोर्चाच्या संघटनेकडून शेतकऱ्यांनसाठी उपक्रम राबवा तसेच पदाधिका-यांनी समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत ख-या शेतकऱ्यांपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा तेव्हाच किसान मोर्चाचा उद्देश सफल झाला असे वाटेल. यावेळी किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष किशोर नरे, निरोम सरपंच उमेश मांजरेकर आदि मान्यवर उपस्थित होते. आभार आणि समारोप तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर यांनी मानले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)