25.4 C
Mālvan
Thursday, February 13, 2025
IMG-20240531-WA0007

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता.

- Advertisement -
- Advertisement -

आरबीआयने विनातारण कृषीकर्जाची मर्यादा वाढवली ; लवकरच परीपत्रक जारी होणार.

ब्यूरो न्यूज : आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी काही धोरणात्मक निर्णय घेत असताना शेतकऱ्यांसाठी खास निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये आरबीआयने शेतकऱ्यांसाठी कर्जाचे नियम काही प्रमाणात सोपे केले आहेत. आरबीआयने शेतकऱ्यांसाठी कोणत्याही हमीशिवाय कृषी कर्जाची मर्यादा ही २ लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मर्यादा फक्त १.६० लाख रुपये इतकी होती. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कर्ज घेताना कोणतीही वस्तू गहाण ठेवावी लागणार नाहीये. याआधी शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी काही गोष्टी गहाण ठेवाव्या लागत होत्या. परंतु, आरबीआयने आता यामध्ये काही बदल केला आहे. विनातारण शेतकऱ्यांना मिळणार कर्जवाढत्या महागाईपासून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या प्रकारच्या कर्जाची मर्यादा पूर्वी १.६ लाख रुपये इतकी होती. पतधोरण आढाव्याबाबत माहिती देत असताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती आणि महागाई लक्षात घेता हमीमुक्त कृषी कर्जाची मर्यादा वाढवली आहे. यामुळे अल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्याची व्याप्ती वाढेल, असं ते म्हणाले. आरबीआयने २०१० मध्ये कृषी क्षेत्राला कोणत्याही हमीशिवाय १ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर २०१९ मध्ये त्यामध्ये वाढ करून ती मर्यादा १.६ लाख रुपये इतकी केली. अशातच आता ही मर्यादा २ लाख रुपये इतकी केली आहे. याबाबतचे परीपत्रक लवकरच आरबीआय कडून जारी करण्यात येणार आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आरबीआयने विनातारण कृषीकर्जाची मर्यादा वाढवली ; लवकरच परीपत्रक जारी होणार.

ब्यूरो न्यूज : आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी काही धोरणात्मक निर्णय घेत असताना शेतकऱ्यांसाठी खास निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये आरबीआयने शेतकऱ्यांसाठी कर्जाचे नियम काही प्रमाणात सोपे केले आहेत. आरबीआयने शेतकऱ्यांसाठी कोणत्याही हमीशिवाय कृषी कर्जाची मर्यादा ही २ लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मर्यादा फक्त १.६० लाख रुपये इतकी होती. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कर्ज घेताना कोणतीही वस्तू गहाण ठेवावी लागणार नाहीये. याआधी शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी काही गोष्टी गहाण ठेवाव्या लागत होत्या. परंतु, आरबीआयने आता यामध्ये काही बदल केला आहे. विनातारण शेतकऱ्यांना मिळणार कर्जवाढत्या महागाईपासून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या प्रकारच्या कर्जाची मर्यादा पूर्वी १.६ लाख रुपये इतकी होती. पतधोरण आढाव्याबाबत माहिती देत असताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती आणि महागाई लक्षात घेता हमीमुक्त कृषी कर्जाची मर्यादा वाढवली आहे. यामुळे अल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्याची व्याप्ती वाढेल, असं ते म्हणाले. आरबीआयने २०१० मध्ये कृषी क्षेत्राला कोणत्याही हमीशिवाय १ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर २०१९ मध्ये त्यामध्ये वाढ करून ती मर्यादा १.६ लाख रुपये इतकी केली. अशातच आता ही मर्यादा २ लाख रुपये इतकी केली आहे. याबाबतचे परीपत्रक लवकरच आरबीआय कडून जारी करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!