28.2 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

शांतीचा मार्ग सुखाकडे नेईल ; प्रभाकर हडकर यांचे मसुरे येथे प्रतिपादन.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या, मसुरे बौद्ध विकास मंडळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने प्रभाकर हडकर यांनी उद्बोधन केले. जगामध्ये हिंसांचे प्रकार वाढत असून याला आळा घालण्यासाठी तथागतांचा धम्मच सावरू शकेल. तथागतांचे सम्यक विचार, सम्यक वाणी प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये अंगीकारवी असे यावेळी प्रभाकर हडकर म्हणाले. यावेळी विचार मंचावर ग्रामीण शाखेचे अध्यक्ष सुगंध तांबे, मुंबई मंडळाचे सचिव संतोष तांबे, अनिल तांबे, बाबुराव तांबे, मिलिंद तांबे, राजेंद्र तांबे, दीपक तांबे, मुरलीधर तांबे,सागर तांबे, गणेश तांबे, प्रमिल तांबे, महिला मंडळाच्या अध्यक्ष वेदिका तांबे, मृणाल तांबे, अवंतिका तांबे, मेनका तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.

सायंकाळच्या सत्रामध्ये शालेय विद्यार्थ्यांना वर्षभरामध्ये लागणारे साहित्य वितरीत करण्यात आले. बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. बीएमसी मधून सेवानिवृत्त झालेले मुरलीधर तांबे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच वाडीमध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम साजरे केले जातात त्यावेळी भोजनाची व्यवस्था उत्कृष्टपणे सांभाळणारे सुभाष कासले, बबन तांबे यांचाही शाल आणि पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद तांबे आणि आभार सागर तांबे यांनी मानले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या, मसुरे बौद्ध विकास मंडळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने प्रभाकर हडकर यांनी उद्बोधन केले. जगामध्ये हिंसांचे प्रकार वाढत असून याला आळा घालण्यासाठी तथागतांचा धम्मच सावरू शकेल. तथागतांचे सम्यक विचार, सम्यक वाणी प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये अंगीकारवी असे यावेळी प्रभाकर हडकर म्हणाले. यावेळी विचार मंचावर ग्रामीण शाखेचे अध्यक्ष सुगंध तांबे, मुंबई मंडळाचे सचिव संतोष तांबे, अनिल तांबे, बाबुराव तांबे, मिलिंद तांबे, राजेंद्र तांबे, दीपक तांबे, मुरलीधर तांबे,सागर तांबे, गणेश तांबे, प्रमिल तांबे, महिला मंडळाच्या अध्यक्ष वेदिका तांबे, मृणाल तांबे, अवंतिका तांबे, मेनका तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.

सायंकाळच्या सत्रामध्ये शालेय विद्यार्थ्यांना वर्षभरामध्ये लागणारे साहित्य वितरीत करण्यात आले. बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. बीएमसी मधून सेवानिवृत्त झालेले मुरलीधर तांबे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच वाडीमध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम साजरे केले जातात त्यावेळी भोजनाची व्यवस्था उत्कृष्टपणे सांभाळणारे सुभाष कासले, बबन तांबे यांचाही शाल आणि पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद तांबे आणि आभार सागर तांबे यांनी मानले.

error: Content is protected !!