ग्रामस्थांनी आम. वैभव नाईक यांचे मानले आभार
कणकवली | उमेश परब : कणकवली-आचरा मार्गावरील गाव किर्लोस,शिरवंडे गावाशी जोडण्याचा मार्ग मोकळा झाला असून किर्लोस गडनदी येथे पूल मंजूर करण्यात आला आहे. मालवण तालुक्यात मोडणाऱ्या गडनदीवर किर्लोस बंधाऱ्याच्या जवळ 120 मीटर लांबीचा व 8 कोटी 28 लाख रक्कम खर्च असलेला मोठा पूल मंजूर झाला असून निविदा प्रक्रिया झाली आहे. सदर पूल व्हावा अशी ग्रामस्थांची अनेक दिवसांची मागणी होती. या पुलामुळे आचरा मार्गावरील अनेक गाव किर्लोस, असगणी, शिरवंडे, असरोंडी व अन्य गावांशी जोडले जाणार आहेत .हीपुलाची मागणी पुन्हा पूर्ण केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक , खास.विनायक राऊत ,पालकमंत्री नाम.उदय सामंत यांचे किर्लोस व पंचक्रोशीतर्फे आभार किर्लोस गावचे सरपंच प्रदीप सावंत, उपसरपंच दीपक किर्लोस्कर,माजी सरपंच पंढरी घाडीगांवकर, शिवसेना मालवण उपतालुकाप्रमुख बाबा सावंत,विकास लाड व इतरांनी मानले असून आम.वैभव नाईक यांची भेट घेत आभार व्यक्त केले आहेत.