मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील वायंगवडे येथे तालुका कृषि अधिकारी कार्यालय मालवणचे अधिकारी व कर्मचारी तसेच शेतकरी मिळुन श्रमदानाने वनराई बंधारा बांधण्यात आला यावेळी सरपंच श्रीम.विशाखा सकपाळ, उपसरपंच श्री. विनायक परब, तालुका कृषी अधिकारी श्री. विश्वनाथ गोसावी, मंडळ कृषी अधिकारी श्री. अतुल कांबळे, कृषी पर्यवेक्षक श्री. धनंजय गावडे, श्री. एस. जी. परब, श्री. डी. के. सावंत , कृषी सहा. श्रीम.अमृता भोगले, श्रीम. एस. व्ही. जिकमडे. श्रीम. कुबल, श्रीम. धामापूरकर , श्री. सुनिल , श्री. ए. आर. धुरी, श्री. शुशिल शिंदे श्री. मिलिंद कदम, श्री. सौंगडे, आत्मा व्यवस्थापक श्री. निलेश गोसावी, ग श्रीम. सानिका सकपाळ, श्रीम. सानिका राणे, श्रीम. शुष्मा परब, श्री. अरुण परब, महेश राणे, दादू राणे, विजय परब, विजय राणे, श्रावण परब, सुरेश परब, गणपत कदम व ज्ञानेश्वर परब इत्यादी शेतकरी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित शेतक-यांना वनराई बंधारे बाधण्याचे महत्त्व व रब्बी पिक क्षेत्रात वाढ बाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच कृषि विभागाकडील सध्यस्थितीत चालू योजनांची माहिती देऊन सहभाग नोंदविण्यास सुचविले.