28.2 C
Mālvan
Saturday, October 19, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

अणाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी..!

- Advertisement -
- Advertisement -

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून उभारलेल्या भव्य समाजमंदिराचे झाले उद्घाटन..

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अणाव ग्रामपंचायत व अणाव बौद्ध उन्नती मंडळ यांच्या वतीने आज अणाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आमदार वैभव नाईक यांच्या आमदार फंडातून १० लाख रु खर्चून उभारण्यात आलेल्या भव्य समाजमंदिराचे उद्घाटन आ. वैभव नाईक यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. समाज मंदिरासाठी निधी मंजूर केल्याबद्दल समाज बांधवांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ध्वजारोहण कऱण्यात आले.


यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मूलमंत्र दिला.तो जोपासला पाहिजे. त्यांनी जी शिकवण आपल्याला दिली ती आपण आचारणात आणली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्य घटना जगभर अभ्यासली जात आहे. सगळ्या समाजातील नागरिकांना सामान अधिकार त्यांनी मिळवून दिला. जगभर त्यांचे आदर्श घेतले जातात.तळागाळातील लोकांपर्यत त्यांचे विचार पोहोचले आहेत. मात्र काही जातीयवादी पक्ष झाले आहेत ते आपल्या राज्य घटनेत बदल करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु राज्य घटनेत बदल करणे त्यांना शकय होणार नाही.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधी जात-पात बघितली नाही. त्यांच्या शिकवणी नुसार समाजातील रंजलेल्या गांजलेल्याना मदत करण्याचे काम शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मी व माझे सहकारी करत आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शहरात साजरी केली जाते. परंतु ग्रामीण भागातील लोक देखील मुख्य प्रवाहात येण्यासाठी ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले.

       यावेळी  शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जि. प. सदस्य नागेंद्र परब, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,  कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी,माजी उपसभापती जयभारत पालव,आपा मांजरेकर, नारायण मांजरेकर, बाळू पालव, छोटू पारकर, अमित भोगले, सावळाराम अणावकर, गुरुप्रसाद  दळवी, अविनाश अणावकर, शिवराम अणावकर, प्रल्हाद  अणावकर,स्वप्नील जाधव, संगीता  अणावकर,छाया  अणावकर, सुजाता अणावकर, विनायक अणावकर, सुप्रिया अणावकर, सावळाराम धुरी, संदीप परब, विकास  अणावकर,  गजानन कुलकर्णी, समीर आंगणे, ममता पालव, सुरेश जाधव, सुनील कुलकर्णी आदींसह  बौद्ध उन्नती मंडळाचे कार्यकर्ते व  अणाव येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून उभारलेल्या भव्य समाजमंदिराचे झाले उद्घाटन..

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अणाव ग्रामपंचायत व अणाव बौद्ध उन्नती मंडळ यांच्या वतीने आज अणाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आमदार वैभव नाईक यांच्या आमदार फंडातून १० लाख रु खर्चून उभारण्यात आलेल्या भव्य समाजमंदिराचे उद्घाटन आ. वैभव नाईक यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. समाज मंदिरासाठी निधी मंजूर केल्याबद्दल समाज बांधवांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ध्वजारोहण कऱण्यात आले.


यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मूलमंत्र दिला.तो जोपासला पाहिजे. त्यांनी जी शिकवण आपल्याला दिली ती आपण आचारणात आणली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्य घटना जगभर अभ्यासली जात आहे. सगळ्या समाजातील नागरिकांना सामान अधिकार त्यांनी मिळवून दिला. जगभर त्यांचे आदर्श घेतले जातात.तळागाळातील लोकांपर्यत त्यांचे विचार पोहोचले आहेत. मात्र काही जातीयवादी पक्ष झाले आहेत ते आपल्या राज्य घटनेत बदल करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु राज्य घटनेत बदल करणे त्यांना शकय होणार नाही.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधी जात-पात बघितली नाही. त्यांच्या शिकवणी नुसार समाजातील रंजलेल्या गांजलेल्याना मदत करण्याचे काम शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मी व माझे सहकारी करत आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शहरात साजरी केली जाते. परंतु ग्रामीण भागातील लोक देखील मुख्य प्रवाहात येण्यासाठी ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले.

       यावेळी  शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जि. प. सदस्य नागेंद्र परब, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,  कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी,माजी उपसभापती जयभारत पालव,आपा मांजरेकर, नारायण मांजरेकर, बाळू पालव, छोटू पारकर, अमित भोगले, सावळाराम अणावकर, गुरुप्रसाद  दळवी, अविनाश अणावकर, शिवराम अणावकर, प्रल्हाद  अणावकर,स्वप्नील जाधव, संगीता  अणावकर,छाया  अणावकर, सुजाता अणावकर, विनायक अणावकर, सुप्रिया अणावकर, सावळाराम धुरी, संदीप परब, विकास  अणावकर,  गजानन कुलकर्णी, समीर आंगणे, ममता पालव, सुरेश जाधव, सुनील कुलकर्णी आदींसह  बौद्ध उन्नती मंडळाचे कार्यकर्ते व  अणाव येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!