सुख नदीवर बंधारा होणार ; ५० लाख रुपयांचा निधी मंजूर.
वाभवे एडगावला मिळणार पाणी..!
वैभववाडी | नवलराज काळे :
वैभववाडी शहर व एडगावच्या मध्य भागातून वाहणाऱ्या सुख नदीच्या पारकोंडीवर ५० लाख रुपये खर्च करून बंधारा होणार आहे.वाभवे नगपंचायतीकडे शासनाकडून विकास कामांसाठी ३ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी आला आहे.त्यातील ५० लाख रुपयांचा निधी बंधाऱ्याच्या कामावर खर्च होणार आहेत .सुख नदीतून वाहणारे पाणी थेट समुद्राला मिळते.बंधारा बांधल्यावर वैभववाडी शहर व एडगाव इनामदार वाडी परिसरातील विहिरींना पाणी साठून राहणार आहे.त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. कणकवली गड नदीच्या धर्तीवर हा बंधारा असेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.आमदार नितेश राणे व वाभवे नगरपंचायत यांच्या प्रयत्नातून हे काम मार्गी लागणार आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)