आचरा | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चिंदर गांवचे ज्येष्ठ सन्माननीय नागरिक श्री मनोहर वासुदेव घाडीगांवकर यांचे २८ सप्टेंबरला मुंबईत वार्धक्याने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. सामाजिक कार्यासोबतच ते बारापाच मानकरी व श्री देवी भगवती माऊली सेवा समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात तीन मुलं, पत्नी, बंधू व नातवंडे असा परिवार आहे.
श्री मनोहर वासुदेव घाडीगांवकर यांच्या निधनाने चिंदर परिसरात शोक व्यक्त होत आहे.