24.6 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

भाजपचे आमदार नितेश राणेंची पावसाळी अधिवेशनात तांडावस्ती सुधार योजनेतून लोकसंख्येचा निकष काढून टाकण्याची मागणी.

- Advertisement -
- Advertisement -

सिंधुदुर्ग व कोकणातील धनगर वस्त्या विकासाच्या प्रवाहात आणण्याचा मानस.

नवलराज काळे | सहसंपादक : तांडा वस्ती सुधार योजनेच्या निधीसाठी लोकसंख्येचा निकष आहे. कोकणातील धनगर समाज दऱ्याखोऱ्यात राहतो एका एका वाडी वरती पुरेशी लोकसंख्या नसल्यामुळे तांडा वस्ती निकषांमध्ये काही धनगर वस्त्या बसत नाहीत. त्यामुळे धनगर वस्तीचा विकास होत नाही आहे ज्या उद्देशाने तांडा वस्ती सुधार योजना लागू केली आहे तो उद्देश साध्य होत नाही. त्यामुळेच तांडा वस्ती सुधार योजनेतून लोकसंख्येचा निकष काढून टाकावा व थेट धनगर वाडीवस्तीना तांडा वस्ती सुधार योजनेतून निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात केली.

या मागणीवर मंत्रिमहोदय यांनी संबंधित विषयासंदर्भात बैठक लावून सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगितले. आमदार नितेश राणे यांच्या मागणी नुसार हा निकष हटवला गेल्यास अनेक कोकणातील धनगर वस्त्या विकासाच्या प्रवाहात येतील त्यामुळे मंत्री महोदयांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सिंधुदुर्ग व कोकणातील धनगर वस्त्या विकासाच्या प्रवाहात आणण्याचा मानस.

नवलराज काळे | सहसंपादक : तांडा वस्ती सुधार योजनेच्या निधीसाठी लोकसंख्येचा निकष आहे. कोकणातील धनगर समाज दऱ्याखोऱ्यात राहतो एका एका वाडी वरती पुरेशी लोकसंख्या नसल्यामुळे तांडा वस्ती निकषांमध्ये काही धनगर वस्त्या बसत नाहीत. त्यामुळे धनगर वस्तीचा विकास होत नाही आहे ज्या उद्देशाने तांडा वस्ती सुधार योजना लागू केली आहे तो उद्देश साध्य होत नाही. त्यामुळेच तांडा वस्ती सुधार योजनेतून लोकसंख्येचा निकष काढून टाकावा व थेट धनगर वाडीवस्तीना तांडा वस्ती सुधार योजनेतून निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात केली.

या मागणीवर मंत्रिमहोदय यांनी संबंधित विषयासंदर्भात बैठक लावून सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगितले. आमदार नितेश राणे यांच्या मागणी नुसार हा निकष हटवला गेल्यास अनेक कोकणातील धनगर वस्त्या विकासाच्या प्रवाहात येतील त्यामुळे मंत्री महोदयांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

error: Content is protected !!