मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मालवण-कसाल या प्रमुख दळणवळणाच्या मार्गावर वराड-सावरवाड तिठा येथे रस्ता खचायचा धोका उत्पन्न होत आहे.
या मार्गावर खोदलेल्या चरांमधून यंदाच्या जोरदार पावसाचे पाणी वाहून ते चर अधिक रुंद झाले आहेत. आता चर व मुख्य डांबरी रस्ता यांमध्ये केवळ ३ फुटांचाच व तोही भुसभूशीत जमिनीचा भाग उरलेला आहे. पुढे मोठा अनर्थ घडण्यापूर्वीच संबंधीत विभाग तथा यंत्रणेने यांकडे गांभीर्याने पहाणी करुन तत्काळ उपाययोजना करावी असे आवाहन या मार्गावरील प्रवासी वर्ग व स्थानिक समाज सेवी व्यक्तींनी केले आहे.