26.8 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

त्रिंबकच्या माजी ग्रामपंचायत सदस्या सौ सुनीता त्रिंबककर कालवश.

- Advertisement -
- Advertisement -

राष्ट्रीय काँग्रेसच्या धडाडीच्या कार्यकर्त्या व दातृत्वशूर व्यक्ती म्हणून होत्या सुप्रसिद्ध.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या त्रिंबक गावच्या रहिवासी आणि त्रिंबक ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या सौ. सुनीता सुधाकर त्रिंबककर (वय ६५) यांचे काल गुरुवारी सायंकाळी साडे चार वाजण्याच्या दरम्यान प्रदीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले.

मालवण तालुक्यातील त्रिंबक गावच्या रहिवासी असणाऱ्या सौ. सुनीता सुधाकर त्रिंबककर या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या धडाडीच्या कार्यकर्त्या होत्या. त्रिंबक ग्रामपंचायतीमध्ये तत्कालीन सदस्य म्हणून काम करताना सौ. त्रिंबककर यांनी गावच्या अनेक प्रश्नावर आवाज उठवून त्या प्रश्नांची सोडवणूक केली होती. दातृत्वशील वृत्तीमुळे त्या गांवात लोकप्रिय होत्या आणि त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता.

गेली काही वर्षे त्या प्रदीर्घ आजाराने आजारी होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सिंधुदुर्ग जिल्हा व मुंबई येथून सर्व स्तरांतून शोक व्यक्त होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

राष्ट्रीय काँग्रेसच्या धडाडीच्या कार्यकर्त्या व दातृत्वशूर व्यक्ती म्हणून होत्या सुप्रसिद्ध.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या त्रिंबक गावच्या रहिवासी आणि त्रिंबक ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या सौ. सुनीता सुधाकर त्रिंबककर (वय ६५) यांचे काल गुरुवारी सायंकाळी साडे चार वाजण्याच्या दरम्यान प्रदीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले.

मालवण तालुक्यातील त्रिंबक गावच्या रहिवासी असणाऱ्या सौ. सुनीता सुधाकर त्रिंबककर या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या धडाडीच्या कार्यकर्त्या होत्या. त्रिंबक ग्रामपंचायतीमध्ये तत्कालीन सदस्य म्हणून काम करताना सौ. त्रिंबककर यांनी गावच्या अनेक प्रश्नावर आवाज उठवून त्या प्रश्नांची सोडवणूक केली होती. दातृत्वशील वृत्तीमुळे त्या गांवात लोकप्रिय होत्या आणि त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता.

गेली काही वर्षे त्या प्रदीर्घ आजाराने आजारी होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सिंधुदुर्ग जिल्हा व मुंबई येथून सर्व स्तरांतून शोक व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!