मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या माळगांव भोगलेवाडी तिठा ते बौद्ध वाडी येथील रस्ता नैसर्गिकरीत्या खचलेला आहे. या मुळे हा रस्ता अपघातासला कारण ठरत आहे. संबंधीत विभागाने या बद्दल त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांनी व सामाजिक क्षेत्रांतील सेवकांनी केली आहे. मालवण पंचायत समितीच्या उप कार्यकारी अभियंता यांना या संदर्भात लेखी निवेदन दिले गेले आहे.
सदर रस्ता हा माळगांव बालोजी वाडी व बिळवस सातेरी मंदिराला जोडलेला आहे. या रस्त्याने कायम वाहतूक चालू असते व शाळेतील मुलासाठी सुद्धा येण्याजण्या साठी तोच रस्ता आहे. हा रस्ता आपत्ती निवारण म्हणून समजण्यात यावा. तसेच बौद्ध वाडी येथील रस्त्याची डागडुजी लवकरात लवकर करण्यात यावी अन्यथा अपघात होऊन मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे. भोगलेवाडी ग्रामस्थ मंडळाची मागणी आहे की बौद्ध वाडी येथील रस्त्याची डागडुजी आपत्ती निवारण योजनेखाली दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी सूर्यकांत कृष्णाजी रावराणे (अध्यक्ष, भोगलेवाडी ग्रामस्थ मंडळ) आणि बागायत येथील सामाजिक कार्यकर्ते समीर पेडणेकर यांनी केली आहे.