संतोष साळसकर | सहसंपादक : दिव्यांग व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत १००० रु. पेंशन मिळते. मात्र ही पेंशन योजना तुटपुंजी असली तरी दिव्यांग व्यक्तींना आधारभूत आहे. मात्र ही पेन्शन दिव्यांग व्यक्तींना कधी कधी दोन – तीन महिने मिळत नाही. त्यामुळे त्या दिव्यांग व्यक्तीची आर्थिक घडी बसते.याकडे विद्यमान सरकार लक्ष देईल का? असा सवाल समस्त दिव्यांग बांधव करीत आहेत.
अलीकडे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि आता हा जानेवारी महिना अर्धा संपला तरी देखील अद्यापही दिव्यांग व्यक्तींच्या खात्यावर पेन्शन जमा झालेली नाही. जर अशी तुटपुंजी पेन्शन सुद्धा जर प्रशासन, शासन वेळेत देण्यास हतबल असेल तर संबंधीत अधिकाऱ्यांना येत्या २६ जानेवारी रोजी धारेवर धरून जाब विचारणार असल्याच्या प्रतिक्रिया दिव्यांग व्यक्तींकडून जोर धरू लागल्या आहेत.