26.8 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

त्या कापुर कंपनीने मागितली जाहीर माफी ; बांदावासियांच्या त्याग आंदोलनाला भरीव यश.

- Advertisement -
- Advertisement -

आमदार नितेश राणे यांनी दिलेला शब्द खरा केल्याबद्दल व्यक्त होतेय समाधान.

पत्रकार आशुतोष भांगले , बांदावासिय नागरीक व सरपंच अक्रम ख़ान यांनी केला होता पाठपुरावा.

बांदा | राकेश परब : अवघ्या हिंदुस्थानचे व जगातील हिंदू बंधु भगिनींचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांचा अपमान करणाऱ्या कापूर कंपनीने अखेर श्रीरामभक्तांची जाहीर माफी मागितली आहे. यासाठी गेलेवर्षभऱ बांदा येथे या कापराचा वापर व विक्री बंद करुन त्याग आंदोलन सुरु ठेवले होते.या आंदोलनाची दखल आमदार नितेश राणे यांनी घेतली व त्या कापूर कंपनीला माफी मागायाला लावणार असा शब्द दिला होता.
त्यानंतर केवळ एका आठवड्यातच या कंपनीने जाहीर माफी मागितली आहे.त्याग आंदोलनाचे प्रणेते आशुतोष भांगले यांनी समस्त आंदोलकांच्यावतीने आमदार नितेश राणे यांचे जाहीर आभार मानले आहेत.

सुमारे वर्षभरापूर्वी ही जाहीरात पाहून बांदा येथिल पत्रकार तथा बांदा श्री विठ्ठल मंदिराचे सेवक आशुतोष भांगले यांनी या कापराचा त्याग करुन हे त्याग आंदोलन सुरु केले होते. त्यांना साथ देत बांद्यातील पाच देवस्थाने,१६ व्यापारी व दोनशे सेवेकरी या त्याग आंदोलनात सहभागी झाले.कंपनीने जाहीरात बंद करावी व जाहीर माफी मागावी ही आंदोलकांची अट होती.

या आंदोलनाची दखल आमदार नितेश राणे यांनी घेतली व ते स्वत: बांद्याला येऊन बांद्यातील व्यापारी ,भाविक व सेवेकऱ्यांना भेटले. आपल्या भेटीत त्यांनी दिलेला शब्द पाळला.दौऱ्यानंतर मुंबई येथे येताच त्यांना संबंधीत कंपनीला दणका देताच. कंपनीने तात्काळ माफी मागणारा व्हि़डियो प्रसारीत केला.कंपनीने ही जाहीरात बंद केल्याचे जाहीर केले.तसेच आपला श्रीरामभक्तांना दुखविण्याचा कोणताही हेतू नव्हता.सर्व भाविकांची आम्ही जाहीर माफी मागत असल्याचे कंपनीने प्रसारित केेलेल्या व्हिडिओत म्हटले आहे.

आशुतोष भांगले यांनी बांदा गावाला मिळालेल्या या संघटीत यशाबद्दल आनंद व्यक्त केला. आमदार नितेश राणे, बांदा सरपंच अक्रम खान तसेच सहभागी देवस्थाने,व्यापारी,सेवेकरी व भाविकांचेही जाहीर आभार मानले आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आमदार नितेश राणे यांनी दिलेला शब्द खरा केल्याबद्दल व्यक्त होतेय समाधान.

पत्रकार आशुतोष भांगले , बांदावासिय नागरीक व सरपंच अक्रम ख़ान यांनी केला होता पाठपुरावा.

बांदा | राकेश परब : अवघ्या हिंदुस्थानचे व जगातील हिंदू बंधु भगिनींचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांचा अपमान करणाऱ्या कापूर कंपनीने अखेर श्रीरामभक्तांची जाहीर माफी मागितली आहे. यासाठी गेलेवर्षभऱ बांदा येथे या कापराचा वापर व विक्री बंद करुन त्याग आंदोलन सुरु ठेवले होते.या आंदोलनाची दखल आमदार नितेश राणे यांनी घेतली व त्या कापूर कंपनीला माफी मागायाला लावणार असा शब्द दिला होता.
त्यानंतर केवळ एका आठवड्यातच या कंपनीने जाहीर माफी मागितली आहे.त्याग आंदोलनाचे प्रणेते आशुतोष भांगले यांनी समस्त आंदोलकांच्यावतीने आमदार नितेश राणे यांचे जाहीर आभार मानले आहेत.

सुमारे वर्षभरापूर्वी ही जाहीरात पाहून बांदा येथिल पत्रकार तथा बांदा श्री विठ्ठल मंदिराचे सेवक आशुतोष भांगले यांनी या कापराचा त्याग करुन हे त्याग आंदोलन सुरु केले होते. त्यांना साथ देत बांद्यातील पाच देवस्थाने,१६ व्यापारी व दोनशे सेवेकरी या त्याग आंदोलनात सहभागी झाले.कंपनीने जाहीरात बंद करावी व जाहीर माफी मागावी ही आंदोलकांची अट होती.

या आंदोलनाची दखल आमदार नितेश राणे यांनी घेतली व ते स्वत: बांद्याला येऊन बांद्यातील व्यापारी ,भाविक व सेवेकऱ्यांना भेटले. आपल्या भेटीत त्यांनी दिलेला शब्द पाळला.दौऱ्यानंतर मुंबई येथे येताच त्यांना संबंधीत कंपनीला दणका देताच. कंपनीने तात्काळ माफी मागणारा व्हि़डियो प्रसारीत केला.कंपनीने ही जाहीरात बंद केल्याचे जाहीर केले.तसेच आपला श्रीरामभक्तांना दुखविण्याचा कोणताही हेतू नव्हता.सर्व भाविकांची आम्ही जाहीर माफी मागत असल्याचे कंपनीने प्रसारित केेलेल्या व्हिडिओत म्हटले आहे.

आशुतोष भांगले यांनी बांदा गावाला मिळालेल्या या संघटीत यशाबद्दल आनंद व्यक्त केला. आमदार नितेश राणे, बांदा सरपंच अक्रम खान तसेच सहभागी देवस्थाने,व्यापारी,सेवेकरी व भाविकांचेही जाहीर आभार मानले आहेत.

error: Content is protected !!