अॕड .संग्राम गावडे यांचा रोखठोक सवाल.
लेखी निवेदनाद्वारे नोंदवली तक्रार..!
मालवण | सहिष्णू पंडित :
या संबंधात असे कळते की, सावंतवाडीनजीक आंबोली बाजारपेठ येथे अधिकृत चेकपोस्टची उभारणी झालेली असून तेथे बेळगाव, कोल्हापूरहून सावंतवाडी, गोवा येथे जाणा-या गाड्यांची तपासणी होत असते.असे असताना माडखोल या लगतच्याच चेकपोस्टवर पुन्हा ही तपासणी होत असते.तसेच या प्रकारची तपासणी परत बांदा तपासणी नाक्यावरही होते.म्हणजे एकाच वाहनाला तीनवेळा तपासणीस सामोरे जावे लागल्याने वाहकांना आर्थिक व मानसिक पिळवणुकीला सामोरे जावे लागत आहे.
अशा स्थितीत माडखोल तपासणी नाका हा कायदेशीर नसल्याचेच वातावरण दिसते आहे.
पूर्णवेळ कर्मचारी नसणे, त्रासदायक बॕरिकेडस आणि वाहकांना दंडासाठी दमदाटी या बाबी वाहकांना उपद्रवी ठरत आहेत.तेव्हा सदरच्या चेकपोस्टची चौकशी होऊन योग्य ती कारवाई केली जावी.अशी तक्रार सावंतवाडी येथील अॕड.संग्राम गावडे यांनी लेखी निवेदनाद्वारे दिली आहे.या तक्रारीची गंभीरपणे दखल घेतली जावी अशीही विनंती तक्रारदार संग्राम गावडे यांनी केली आहे.