मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :मालवण तालुक्यातील रेवंडी गावचे सुपुत्र अंकुश कांबळी याना रत्नागिरी येथे झालेल्या ६० व्या महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट नेपथ्या साठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. “तुका म्हणे आता ” या नाटकासाठी सदर पारितोषिक त्यांना प्राप्त झाले आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कला संचालनालयाच्या वतीने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सहभागी १६ नाटकांमधून ही निवड झाली आहे. यापूर्वी सुद्धा अनेक पुरस्कारांनी अंकुश कांबळी यांचा सन्मान करण्यात आला आहे.राज्य नाट्य स्पर्धेत अंकुश कांबळी यांनी मिळविलेल्या यशाबद्दल आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्यावतीने अध्यक्ष भास्कर आंगणे, अनंत आंगणे, काका आंगणे, आनंद आंगणे, शशी आंगणे, मधु आंगणे, नंदू आंगणे, बाळा आंगणे, बाब्या आंगणे, छोटू आंगणे, प्रसिद्ध रंगभूषाकार व मूर्तिकार तारक कांबळी तसेच आंगणेवाडी नाट्य मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -