मधुभाईंची उपस्थिती ठरली विशेष आकर्षण…
चिंदर | विवेक परब : ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांच्या ‘कोकणी ग वस्ती,करुळचा मुलगा,सूर्यफूल, भाकरी आणि फूल,संधीकाल,जुईली,माझा गांव माझा मुलुख’ ह्या पुस्तकांतील काही अंशांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
कोमसाप सिंधुदुर्गने हा अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
यात अनुक्रमे सुरेश ठाकूर,ऊषा परब,आनंद वैद्य,वृंदा कांबळी, विठ्ठल कदम,अरुण मर्गज,मंगेश मसके, धडाकेबाज कवी व साहित्यिक रुजारिओ पिंटो यांनी भाग घेतला.
“वयाच्या दहाव्या दशकात पदार्पण करताना माझ्याच साहित्यकृतिने माझे केलेले अभिष्टचिंतन हे अलौकिक बाब होती माझ्यासाठी.अश्या संकल्पना आरती प्रभूंनाच सुचत असे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी भारावून जाऊन सांगितले.
‘चांदणे उन्हातले ‘ ही मूळ संकल्पना विठ्ठल कदम यांची होती. कोमसाप मालवणचे अध्यक्ष आणि साहित्यिक सुरेश ठाकूर यांनी सांगितले की सर्व अभिवाचकांनी आपल्या अभिवाचनाचे एक एक सोनचाफ्याचे फूल ज्या वेळी मधुभाईच्या ओंजळीत वाहीले आणि त्या वेळी मधुभाई भारावूनच गेल्याचे उपस्थित सर्वांना जाणवले.
कार्यक्रमाची पूर्वतयारी मंदार मसके आणि कोमसाप युवाकार्यकर्ते कुडाळ यांनी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सुरेश ठाकूर यांच्या खास “ठाकूर शैलीत” झाल्याने कार्यक्रमात रंगत आल्याची उपस्थित रसिकांची प्रतिक्रिया होती.