बांदा | राकेश परब : अमृततुल्य अजरामर स्वरांनी सात दशके अविरतपणे भारत आणि जग भरातील रसिकांच्या अंत:करणाचा ठाव घेणा-या गानसम्राज्ञी भारत रत्न लता मंगेशकर यांना बांदा येथील नट वाचनालयाच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी माजी मुख्याध्यापक धोंडु फणसीकर यांनी लताजींच्या प्रतीमेला पुष्प हार अर्पण केला. यावेळी एस आर सावंत, सुभाष मोर्ये, हेमंत मोर्ये, राकेश केसरकर, जगन्नाथ सातोसकर, निलेश मोरजकर, सौ स्वप्निता सावंत,अर्जुन परब,ग्रथपाल प्रमिला मोरजकर-नाईक, सौ नमिता परब उपस्थित होत्या.या प्रसंगी सुभाष मोर्ये यानी बोलताना सांगीतले, लता दिदी हा न संपणारा विषय आहे. किती सांगावे,लिहावे, बोलावे तेवढे थोडेच आहेच पण त्याही पेक्षा महत्वाचे हे आहे की हा विषय कधीच संपु नये ही इच्छा असणे हिच खरी त्यांना श्रध्दाजली आहे. राकेश केसरकर यांनी श्रध्दांजली वाहताना म्हणले की लतादिदींच्या जाण्याने देशात पोकळी निर्माण झाली आहे.त्यांचा आवाज ऐकून कधी कुणाच्या डोळ्यांत अश्रु आले तर कधी “ऐ मेरे वतन के लोगो” या गीताने जवानांना हिम्मत मिळाली. हेमंत मोर्ये यांनी उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार मानले.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -