मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील बिळवस श्री सातेरी जलमंदिर नजीकचा बि एस एन एल चा मोबाइल टॉवर १७ ऑगस्ट पासून बंद असल्याने मोबाइल धारकांची गैरसोय होत आहे. या संदर्भात येथील ग्रामस्थांनी मालवण तसेच सावंतवाडी येथील कार्यालयात अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून सुद्धा दाखल घेतली जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या परिसरात इतर कोणतीही रेंज उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना याच टॉवर वरून मिळणाऱ्या नेटवर्कचा आधार असतो.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रात्रीच्या वेळी वैधकीय गरजे साठी मोबाइल नेटवर्क उपलब्ध असणे आवश्यक आहे. सध्या शासनाच्या विविध योजनासाठी ऑनलाईन फॉर्म भरणे चालू असल्याने नेटवर्क अभावी ‘ओटीपी’ येत नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. दोन दिवसांत टॉवर मधील बिघाड दूर न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.