27.6 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

शाळेच्या छपर दुरुस्तीसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता ; कांदळगांव सरपंचांचा दावा.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील कांदळगांव गांवचे सरपंच श्री. रणजीत परब यांनी या दुर्घटने बद्दल जिल्ह्यातील सत्ताधार्यांना जबाबदार धरले आहे व यासाठी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला असल्याचा दावा केला आहे. मालवण तालुक्यातील कांदळगांव जि प. शाळा नंबर २ चे छप्पर, १५ जूनला कोसळून हानी झाली. हे छप्पर गेल्या वर्षभरापासून नादुरुस्त होते. शाळांच्या छप्परांची दुरुस्ती जिल्हा नियोजनच्या निधी मधून केली जाते.त्यासाठी वेगळा कुठलाही निधी नसतो. ग्रामपंचायत देखील छप्पर दुरुस्तीचा खर्च करू शकत नाही. त्यामुळे कांदळगांव शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी सातत्याने आम्ही जिल्हा नियोजनकडे आणि जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायत स्तरावरून पाठपुरावा करत होतो. आमदार वैभव नाईक यांनी देखील निधी मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता. तरी देखील जिल्ह्याच्या सत्ताधाऱ्यांकडून कांदळगांव शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आला नाही. जिल्हा नियोजनचे पैसे अनावश्यक ठिकाणी खर्च करण्यात आले. शाळा दुरुस्ती ऐवजी सन्माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला त्याचबरोबर शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी कोट्यावधींचा खर्च करण्यात आला असे कांदळगांव सरपंच यांचे म्हणणे आहे.दरम्यान पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे लक्ष नसल्याने निधी अभावी नादुरुस्त असलेले छप्पर कोसळले. त्याला सर्वस्वी सत्ताधारी भाजप जबाबदार आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. मात्र सत्ताधारी भाजपचा बेजबाबदारपणा झाकण्यासाठी दोन दिवसांपूर्वी माजी खासदार निलेश राणे यांनी शाळेच्या कोसळलेल्या छप्पराची पाहणी केली असा आरोप कांदळगांव सरपंच यांनी केला आहे. परंतु यावर दुर्लक्ष करणाऱ्या पालकमंत्र्यांना जाब विचारण्याची हिंमत माजी खासदार निलेश राणे दाखवतील का असा सवाल कांदळगांव सरपंच श्री. रणजित परब यांनी केला आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील कांदळगांव गांवचे सरपंच श्री. रणजीत परब यांनी या दुर्घटने बद्दल जिल्ह्यातील सत्ताधार्यांना जबाबदार धरले आहे व यासाठी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला असल्याचा दावा केला आहे. मालवण तालुक्यातील कांदळगांव जि प. शाळा नंबर २ चे छप्पर, १५ जूनला कोसळून हानी झाली. हे छप्पर गेल्या वर्षभरापासून नादुरुस्त होते. शाळांच्या छप्परांची दुरुस्ती जिल्हा नियोजनच्या निधी मधून केली जाते.त्यासाठी वेगळा कुठलाही निधी नसतो. ग्रामपंचायत देखील छप्पर दुरुस्तीचा खर्च करू शकत नाही. त्यामुळे कांदळगांव शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी सातत्याने आम्ही जिल्हा नियोजनकडे आणि जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायत स्तरावरून पाठपुरावा करत होतो. आमदार वैभव नाईक यांनी देखील निधी मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता. तरी देखील जिल्ह्याच्या सत्ताधाऱ्यांकडून कांदळगांव शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आला नाही. जिल्हा नियोजनचे पैसे अनावश्यक ठिकाणी खर्च करण्यात आले. शाळा दुरुस्ती ऐवजी सन्माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला त्याचबरोबर शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी कोट्यावधींचा खर्च करण्यात आला असे कांदळगांव सरपंच यांचे म्हणणे आहे.दरम्यान पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे लक्ष नसल्याने निधी अभावी नादुरुस्त असलेले छप्पर कोसळले. त्याला सर्वस्वी सत्ताधारी भाजप जबाबदार आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. मात्र सत्ताधारी भाजपचा बेजबाबदारपणा झाकण्यासाठी दोन दिवसांपूर्वी माजी खासदार निलेश राणे यांनी शाळेच्या कोसळलेल्या छप्पराची पाहणी केली असा आरोप कांदळगांव सरपंच यांनी केला आहे. परंतु यावर दुर्लक्ष करणाऱ्या पालकमंत्र्यांना जाब विचारण्याची हिंमत माजी खासदार निलेश राणे दाखवतील का असा सवाल कांदळगांव सरपंच श्री. रणजित परब यांनी केला आहे.

error: Content is protected !!