मालवण | प्रतिनिधी : कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव यांनी गेल्या काही वर्षांपासून शासनाकडे जमिनीचे तुकडे बंदी कायद्याच्या तरतुदींमध्ये बदल करण्याची मागणी लावून धरली होती. विशेषतः वरकस जमिनींचा तुकडा ८० गुंठे इतकी असल्याने शेतकरी वर्गाला त्याची विक्री तथा हस्तांतरण करणे जिकरीचे होते. आता वरकस व बागायती जमिनींच्या खरेदी – विक्री व्यवहारांमध्ये तुकडेबंदी कायद्याच्या मर्यादीत शिथिलतेमुळे सोपेपणा येईल अशी खात्री आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.
तुकडे बंदी कायद्यात सुधारणा करण्याविषयी महसूल व वनविभागाने अधिसूचना जारी केली असल्याचेही आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. आता राज्यात एकसमान प्रमाणभूत क्षेत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.