ओरोस ( सिंधुदुर्ग नगरी ) | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी २४ ऑगस्ट पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात मनाई आदेश लागू केले आहेत. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, १६ ऑगस्ट पतेती, १७ ऑगस्ट श्रावण महिन्याची सुरवात व २१ तारखेला नाग पंचमी असे राष्ट्रीय व धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर जातीय सलोखा व कायदा सुव्यवस्था संतुलीत रहावी म्हणून हा निर्णय जाहिर केला आहे.
सध्याच्या राजकीय परिस्थिती व घडामोडींमुळे उपोषण, निदर्शने, मोर्चा, रास्तारोको अशा प्रकारांनी सामान्य जनतेची गैरसोय होऊ नये व कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हा मनाई आदेश लागू केला गेला आहे.