28.3 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

मडुरे हायस्कूलच्या ‘वर्ग मैत्रीचा’ मळा फुलला तब्बल ३३ वर्षांनी…!

- Advertisement -
- Advertisement -

मडुरे हायस्कूलच्या १९८८-९० बॅचचे ‘गेट टू गेदर ‘बांदा संपन्न.

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या मडुरा हायस्कूलच्या इयत्ता दहावीच्या सन १९८८-८९  बॅचचे गेट टुगेदर नुकतेच बांदा येथे संपन्न झाले. ३३ वर्षांनंतर मित्रमैत्रिणींनी एकत्र येत शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.

व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनातील दैनंदिन कामकाज बाजूला सारुन मित्रमैत्रिणी एकत्र आले होते. तब्बल ३३ वर्षांनंतर शालेय मित्रमैत्रिणी गेट टुगेदर निमित्त एकत्र आल्याने सर्वांच्याच चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. प्रत्येकजण आपापली सुखदुःखे शेअर करताना दिसत होते. नोकरी, व्यवसायासह कौटुंबिक विचारपूस करताना दिसत होते. शिक्षकांची माहिती, शाळेच्या भौतिक समस्या, आवश्यक बदल यासंबंधीही सर्वांनी चर्चा केली. यानिमित्ताने स्नेहभोजन, कराओके गायन, विविध खेळ आयोजित करण्यात आले होते. अगदी प्राथमिक शालेय स्तरापासूनच्या अनेक आठवणी, शाळेतील किस्से, दंगामस्ती यांना यानिमित्ताने उजाळा मिळाला. नोकरी, व्यवसायात अनेकांनी मिळविलेल्या यशाबद्दल कौतुक करण्यात आले.

यावेळी भगवान कासकर, अर्जुन परब, विठ्ठल धुरी, जयेश माधव, राजन धुरी, राजेंद्र भाईप, विद्याधर नाईक, संतोष चिंदरकर, गोपाळ सातार्डेकर, अजित शेर्लकर, सुधीर ठाकूर, उल्हास परब, गुंडू कुणकेरकर, राजाराम शेर्लेकर, तातो पावसकर, उमेश पंडित, शिवराम जाधव, महेश तळगांवकर, तुकाराम पंडित, गोविंद ठाकूर, नंदा पांचाळ, भारती शेटकर, रेषा भगत, वनिता भाईप, सुजाता आरोसकर, कु़ंदा भगत, ज्योती सावंत व कल्पना गावडे असे मित्र मैत्रीण या वर्गमैत्रीच्या मळ्यात सहभागी झाले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मडुरे हायस्कूलच्या १९८८-९० बॅचचे 'गेट टू गेदर 'बांदा संपन्न.

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या मडुरा हायस्कूलच्या इयत्ता दहावीच्या सन १९८८-८९  बॅचचे गेट टुगेदर नुकतेच बांदा येथे संपन्न झाले. ३३ वर्षांनंतर मित्रमैत्रिणींनी एकत्र येत शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.

व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनातील दैनंदिन कामकाज बाजूला सारुन मित्रमैत्रिणी एकत्र आले होते. तब्बल ३३ वर्षांनंतर शालेय मित्रमैत्रिणी गेट टुगेदर निमित्त एकत्र आल्याने सर्वांच्याच चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. प्रत्येकजण आपापली सुखदुःखे शेअर करताना दिसत होते. नोकरी, व्यवसायासह कौटुंबिक विचारपूस करताना दिसत होते. शिक्षकांची माहिती, शाळेच्या भौतिक समस्या, आवश्यक बदल यासंबंधीही सर्वांनी चर्चा केली. यानिमित्ताने स्नेहभोजन, कराओके गायन, विविध खेळ आयोजित करण्यात आले होते. अगदी प्राथमिक शालेय स्तरापासूनच्या अनेक आठवणी, शाळेतील किस्से, दंगामस्ती यांना यानिमित्ताने उजाळा मिळाला. नोकरी, व्यवसायात अनेकांनी मिळविलेल्या यशाबद्दल कौतुक करण्यात आले.

यावेळी भगवान कासकर, अर्जुन परब, विठ्ठल धुरी, जयेश माधव, राजन धुरी, राजेंद्र भाईप, विद्याधर नाईक, संतोष चिंदरकर, गोपाळ सातार्डेकर, अजित शेर्लकर, सुधीर ठाकूर, उल्हास परब, गुंडू कुणकेरकर, राजाराम शेर्लेकर, तातो पावसकर, उमेश पंडित, शिवराम जाधव, महेश तळगांवकर, तुकाराम पंडित, गोविंद ठाकूर, नंदा पांचाळ, भारती शेटकर, रेषा भगत, वनिता भाईप, सुजाता आरोसकर, कु़ंदा भगत, ज्योती सावंत व कल्पना गावडे असे मित्र मैत्रीण या वर्गमैत्रीच्या मळ्यात सहभागी झाले.

error: Content is protected !!