कणकवली | उमेश परब : गणेश चतुर्थी काही दिवसांवर आली आहे त्यामुळे ,सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेश चतुर्थी पर्यंत १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यावर मा. मुख्यमंत्री यांचा भर आहे. कोविड लसीकरणाच्या दुसऱ्या डोससाठी
सिंधुदुर्ग जिल्ह्याला ज्यादा लसींचा पुरवठा करावा अशी मागणी आ.वैभव नाईक यांनी मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे प्रत्राद्वारे केली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री ५० हजार कोविड लस उपलब्ध करून देणार असल्याची माहिती वैभव नाईक यांच्या द्वारे मिळत आहे . सिंधुदुर्गात मोठ्या संख्येने चाकरमानी येतात परंतु कोरोणाचे संकट अजूनही आहे त्यामुळे जास्तीत जास्त लसीकरण होते आवश्यक आहे. दुसऱ्या डोसची कमतरत भासत असल्याने आ. वैभव नाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे लसींचा मागणी केली होती त्यानुसार मागे २० हजार लसींचा पुरवठा झाला होता त्यातील १५ कोविशिल्ड तर ६ हजार कोव्हॅक्सीनच्या लस होत्या तसेच गेल्या दोन दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्याला २१ हजार कोविड लसी पुरवण्यात आल्याचे आ. वैभव नाईक यांनी सांगितले.