कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : महान कलाकार मच्छिंद्र कांबळी उर्फ बाबूजी यांचा चार एप्रिल हा जयंती दिवस असून तो मालवणी भाषा दिवस म्हणून ओळखला जातो.
या दिवशी मालवणी भाषेचा गौरव करण्याच्या हेतूने सिंधुवैभव साहित्य समूह , कणकवली यांनी मालवणी कवी संमेलन आयोजित केले असून ते दुपारी साडेचार ते साडेपाच या वेळात वेदांत इमेजिंग सेंटर , तेली आळी इथे पार पडेल.
या कार्यक्रमात प्रसिध्द कवी ‘भोवताल’कार विनय सौदागर यांचे काव्यवाचन व त्यानंतर मालवणी कवींचे संमेलन होणार आहे.
सम्मेलन अध्यक्ष सुनंदा कांबळे असून गंगाराम गवाणकर यांची प्रमुख उपस्थिती आहे. तरी मालवणी कवींनी मोठ्या संख्येने भाग घ्यावा व आपल्या नावाची नोंद शैलेश घाडी (7798167627), मीनाक्षी चव्हाण (8805645382), सुरेश पवार (9504395085), यांच्याकडे करावी असे आवाहन सिंधुवैभव साहित्य समूहातर्फे करण्यात आले आहे.