शेतकर्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या, संतोस कानडे
कणकवली | प्रतिनिधी : विजेच्या तारांचा शॉक लागल्यामुळे दोन गाई जागीच मृत्युमुखी पडल्या असून शेतकऱ्याला किरकोळ दुखापत झाली. ही घटना कणकवली येथे आज घडली. यात मोठ्या प्रमाणावर संबंधित शेतकऱ्यांचे नुकसान झाले. दरम्यान झालेला प्रकार लक्षात घेता संबंधित शेतकऱ्याला वीज वितरण कंपनीने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पंचायत समितीचे माजी उपसभापती व भाजप तालुका अध्यक्ष संतोष कानडे यांनी केली आहे.
कणकवलीतील पियाळ येथील शेतकरी विश्वनाथ विश्राम कदम हे सकाळी नेहमीप्रमाणे आपली गुरे चरावयास घेऊन गेले असताना पियाळ प्राथमिक शाळेच्या माळावर गुरे चरत असताना विद्युतभारीत वाहिन्यांमध्ये अडकून २ गायी मयत झाल्या. तसेच त्या तारांमध्ये एक बैल अडकला होता पण त्याला सोडवण्यास विश्वनाथ कदम यांना यश आले. त्याचवेळी कदम यांना विजेचा धक्का लागून ते दूर फेकले गेले, सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. दरम्यान शेतकऱ्याला वीज वितरण कंपनीने नुकसान भरपाई दयावी अशी मागणी पंचायत समितीचे उपसभापती व भाजपा तालुका अध्यक्ष संतोष कानडे यांनी केली आहे.