
कणकवली | ब्यूरो न्यूज : एस्. एम्. हायस्कूल, एम्.सी.व्ही.सी. विभाग, कणकवलीचे प्राध्यापक श्री. रविंद्र गोविंद पाटील (वय ५६) यांचे बुधवार, ११ जून रोजी सकाळी ६ वाजता कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयामध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा गावचे मूळ रहिवासी असलेले पाटील सर कलमठ महाजनी नगर येथे स्थायिक झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. एस. एम. हायस्कुलच्या मराठी विषयाच्या प्राध्यापिका मनिषा पाटील यांचे ते पती होत. त्यांच्या निधनाने विविध स्तरातून शोक व्यक्त केला जातोय.